युद्ध आणि संघर्ष संपत का नाहीत?
युद्ध आणि हिंसक संघर्षांची मूळ कारणं काय आहेत आणि अशा भयंकर घटना अजूनही का घडतात हे बायबलमध्ये सांगितलंय.
पाप
देवाने आपल्या पहिल्या आईवडिलांना, म्हणजे आदाम आणि हव्वाला त्याच्या प्रतिरूपात बनवलं होतं. (उत्पत्ती १:२७) याचा अर्थ ते शांती आणि प्रेम यांसारखे देवाचे गुण स्वाभाविकपणे दाखवू शकत होते. (१ करिंथकर १४:३३; १ योहान ४:८) पण आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडली आणि पाप केलं. याचा परिणाम असा झाला, की आपल्या सगळ्यांना त्यांच्यापासून वारशाने पाप आणि मरण मिळालं. (रोमकर ५:१२) वारशाने मिळालेल्या या पापामुळे माणसांमध्ये चुकीचे विचार आणि चुकीची कामं करायची प्रवृत्ती आहे.—उत्पत्ती ६:५; मार्क ७:२१, २२.
मानवी सरकार
देवाने माणसांना माणसांवर राज्य करण्यासाठी बनवलंच नव्हतं. बायबल म्हणतं: “मनुष्य आपला मार्ग ठरवू शकत नाही. त्याला तर आपली पावलंही नीट टाकता येत नाहीत.” (यिर्मया १०:२३) त्यामुळेच मानवी सरकारं युद्ध आणि हिंसा कायमची काढून टाकू शकत नाहीत.
सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत
बायबल म्हणतं, की “सगळं जग त्या दुष्टाच्या नियंत्रणात आहे.” (१ योहान ५:१९, तळटीप) ‘तो दुष्ट’ म्हणजे सैतान. तो अतिशय खूनी प्रवृत्तीचा आहे. (योहान ८:४४) सैतान आणि त्याचे दुष्ट स्वर्गदूत आज लोकांना युद्ध आणि हिंसा करायला भडकवतात.—प्रकटीकरण १२:९, १२.
युद्धाची आणि हिंसेची मूळ कारणं माणूस नाहीशी करू शकत नाही. पण देव ते नक्कीच करू शकतो