देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | यशया ३४-३७
हिज्कीयाला विश्वासाचं प्रतिफळ मिळालं
जेरूसलेमने शरण यावं ही मागणी करण्यासाठी अश्शूरचा राजा सन्हेरीबने रब-शाकेला पाठवलं. यहूदी लोकांनी न लढता शरण यावं म्हणून अश्शूरी लोकांनी वेगवेगळे तर्कवितर्क करून त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला.
ते एकटे पडतील. इजिप्त देश तुमची काहीच मदत करू शकणार नाही.—यश. ३६:६
शंका निर्माण केली. यहोवा तुमच्या बाजूने लढणार नाही कारण तो तुमच्यावर नाराज आहे.—यश. ३६:७, १०.
भीती दाखवली. अश्शूरच्या शक्तिशाली सैन्यापुढे तुम्ही टिकू शकणार नाही.—यश. ३६:८, ९.
प्रलोभनाचा वापर केला. अश्शूरला शरण आलात तर तुम्ही चांगलं जीवन जगू शकाल.—यश. ३६:१६, १७.
हिज्कीयाने यहोवावर अटळ विश्वास दाखवला
शहराला हल्ल्यापासून वाचवण्यासाठी त्याने शक्य तेवढी तयारी केली
संरक्षणासाठी त्याने यहोवाकडे प्रार्थना केली आणि लोकांनादेखील तसंच करण्याचं प्रोत्साहन दिलं
जेव्हा यहोवाने स्वर्गदूत पाठवून एकाच रात्री १,८५,००० अश्शूरी सैनिकांना मारून टाकलं तेव्हा त्याला त्याच्या विश्वासाचं प्रतिफळ मिळालं