प्रश्न पेटी
▪ पत्राद्वारे साक्ष देताना आपण सावधगिरी का बाळगली पाहिजे?
पत्राद्वारे साक्ष देण्याची ही पद्धत अनेक काळापासून सुवार्ता कळवण्याची प्रभावी पद्धत ठरली आहे. परंतु, अलीकडील घटनांमुळे लोक अनोळखी टपाल उघडण्यास कचरत आहेत. अनोळखी ठिकाणाहून किंवा मागे कोणता पत्ता नसलेले व खासकरून हाताने लिहिलेले व लांबलचक पत्र असेल तर त्याविषयी सहसा संशय वाटू लागतो. घरमालक अशी टपाले न उघडताच फेकून देतील. असे घडू नये म्हणून आपण काय करू शकतो?
शक्य असेल तर, पत्रातील मजकूर आणि पाकीटावरील पत्ता टाईप करणे उत्तम. पाकीटावर घरमालकाचे नाव असले पाहिजे. “घरमालक” असे त्यावर लिहू नये. शिवाय, पाकीटाच्या मागे तुमचा पत्ता लिहायला विसरू नका. तुमचा घरचा पत्ता लिहिणे योग्य नसेल तर तुमचे नाव व राज्य सभागृहाचा पत्ता लिहा. निनावी पत्र पाठवू नका. शाखा दफ्तराचा पत्ता देऊ नका.—आमची राज्य सेवा, नोव्हेंबर १९९६, प्रश्न पेटी पाहा.
याबाबतच्या आणखी सूचना व पत्राचा एक नमुना, ईश्वरशासित सेवा प्रशाला शिक्षणापासून लाभ (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठे ७१-३ वर आहे. हे मार्गदर्शन तुम्हाला दुसऱ्या लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी टपालांचा प्रभावीपणे उपयोग करण्यास मदत करील.