उपदेशक
२ मग मी मनात म्हणालो: “मौजमजा करावी आणि त्यातून आनंद मिळतो का ते पाहावं.” पण शेवटी तेही व्यर्थच होतं!
२ मी म्हणालो, “हसणं म्हणजे मूर्खपणा!”
मी विचार केला, “मौजमजा करूनही माणसाला काय मिळतं?”
३ मी द्राक्षारसात मन रमवून पाहिलं.+ पण मी माझा समंजसपणा* सोडला नाही. मी मूर्खपणाही करून पाहिला. आकाशाखाली माणूस आपल्या थोड्याशा आयुष्यात सर्वात चांगली गोष्ट कोणती करू शकतो, हे मला पाहायचं होतं. ४ मी मोठमोठी कामं हाती घेतली.+ मी स्वतःसाठी घरं बांधली+ आणि द्राक्षमळे लावले.+ ५ मी बागा लावल्या, उद्यानं बनवली आणि त्यांत सर्व प्रकारची फळझाडं लावली. ६ हिरव्यागार झाडांच्या मळ्यांना* पाणी देण्यासाठी, मी तलाव बांधले. ७ मी दासदासी+ ठेवल्या; माझ्या घरातच जन्मलेले दासही* माझ्याकडे होते. मी भरपूर जनावरं विकत घेतली. माझ्याआधी यरुशलेमच्या कोणत्याही राजाकडे नव्हती, इतकी गुरंढोरं आणि मेंढरं+ माझ्याकडे झाली. ८ मी भरपूर सोनंचांदी जमा केली.+ राजांकडून आणि वेगवेगळ्या प्रांतांमधून मौल्यवान वस्तू जमा केल्या.+ मी स्वतःसाठी गायक आणि गायिका ठेवल्या. माणसाच्या मनाला ज्यामुळे आनंद मिळतो, तो स्त्रीचा सहवास, हो, बऱ्याच स्त्रियांचा सहवासही मी उपभोगला. ९ अशा रितीने, माझं ऐश्वर्य वाढत गेलं. माझ्याआधी यरुशलेममध्ये कोणाजवळही नव्हती, इतकी धनसंपत्ती मी मिळवली.+ शिवाय माझी बुद्धीही टिकून होती.
१० माझ्या मनात आलेली प्रत्येक इच्छा* मी पूर्ण केली.+ कोणत्याही सुखाचा उपभोग घेण्यापासून मी आपल्या मनाला रोखलं नाही. मी केलेल्या सर्व मेहनतीमुळे माझं मन आनंदी होतं. हे सगळं त्या मेहनतीचंच फळ* होतं.+ ११ पण मी केलेल्या सर्व कामांबद्दल आणि मेहनतीबद्दल मी विचार केला,+ तेव्हा मला कळलं, की तेही सर्व व्यर्थ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखंच होतं.+ सूर्याखाली खऱ्या मोलाचं* असं काहीच नव्हतं.+
१२ मग मी बुद्धी, वेडेपणा आणि मूर्खपणा यांच्याकडे आपलं लक्ष वळवलं.+ (कारण राजामागून येणारा माणूस वेगळं काय करू शकतो? जे आधी करण्यात आलं आहे तेच.) १३ तेव्हा मला कळलं, की जसा अंधारापेक्षा प्रकाश चांगला, तशी मूर्खपणापेक्षा बुद्धी चांगली आहे.+
१४ बुद्धिमान माणसाला सगळं काही स्पष्ट दिसतं;*+ पण मूर्ख माणूस अंधारात चालत असतो.+ त्या सर्वांचा शेवट एकच असतो,+ हेही मला समजलं आहे. १५ तेव्हा मी मनात म्हणालो: “जे मूर्खासोबत होतं, तेच माझ्यासोबतही होणार.”+ मग इतकी बुद्धी मिळवून मला काय फायदा झाला? म्हणून मी मनात म्हणालो: “हेही व्यर्थच.” १६ कारण बुद्धिमान असो किंवा मूर्ख, कोणाचीही लोकांना कायम आठवण राहत नाही.+ येणाऱ्या दिवसांत लोक सर्वांनाच विसरतील. मूर्खासारखंच बुद्धिमानालासुद्धा मरण येईल.+
१७ म्हणून मला जीवनाचा कंटाळा येऊ लागला,+ कारण सूर्याखाली केली जाणारी सगळी कामं मला त्रासदायक वाटू लागली. सर्वकाही व्यर्थ+ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखं होतं.+ १८ सूर्याखाली खूप मेहनत करून मिळवलेल्या सगळ्या गोष्टी+ मला नकोशा वाटू लागल्या, कारण माझ्यानंतर येणाऱ्या माणसासाठी मला त्या सोडून जाव्या लागणार आहेत.+ १९ कोण जाणे तो बुद्धिमान असेल की मूर्ख?+ तरीही, सूर्याखाली ज्या गोष्टी मिळवण्यासाठी मी इतकी बुद्धी आणि शक्ती खर्च केली, त्यांचा तो ताबा घेईल. हेही व्यर्थच आहे. २० त्यामुळे सूर्याखाली मेहनत करून मी जितकी कामं केली होती, त्यांचा विचार करून माझं मन निराश झालं. २१ कारण माणसाने बुद्धी, ज्ञान आणि कौशल्य वापरून कितीही मेहनत केली, तरीही त्याला आपला वाटा* अशा माणसासाठी सोडून जावा लागेल, ज्याने त्यासाठी मेहनत केली नाही.+ ही फार दुःखाची गोष्ट आहे. हेही व्यर्थच आहे.
२२ सूर्याखाली इतकी मेहनत करून आणि यश मिळवण्यासाठी धडपड करून* माणसाला नक्की काय मिळतं?+ २३ कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या कामामुळे त्याला दुःख आणि निराशा होते.+ त्याच्या मनाला रात्रीही विश्रांती नसते.+ हेही व्यर्थच आहे.
२४ माणसाने खावं-प्यावं आणि आपल्या मेहनतीच्या फळाचा आनंद घ्यावा, हेच त्याच्यासाठी सर्वात चांगलं आहे.+ हे खऱ्या देवाकडून आहे, हेही मला समजलं आहे.+ २५ शेवटी, माझ्यापेक्षा चांगलं खायला प्यायला कोणाला मिळतं?+
२६ जो देवाला खूश करतो, त्याला तो बुद्धी, ज्ञान आणि आनंद देतो.+ पण जो पापी आहे त्याला तो गोळा करण्याचं काम देतो, म्हणजे त्याने गोळा केलेल्या गोष्टी अशा माणसाला मिळतील, जो खऱ्या देवाला खूश करतो.+ हेही व्यर्थ आणि वाऱ्यामागे धावण्यासारखं आहे.