तळटीप
c हिस्ट्री ऑफ द ज्यूझ नामक आपल्या पुस्तकात प्राध्यापक ग्रेट्स म्हणतात, की रोमी लोक कधीकधी दिवसाला ५०० कैद्यांना सुळावर चढवत असत. बंदिवासातील इतर यहुद्यांचे हात कापून त्यांना परत शहरात पाठवण्यात आले. तेथील परिस्थिती कशी होती? “पैशाला काही किंमत नव्हती, कारण त्याने भाकरसुद्धा विकत घेता येत नव्हती. मूठभर कडबा, चामड्याचा एक तुकडा किंवा कुत्र्यांना दिले जाणारे फेकावयाचे मटणाचे तुकडे यासारख्या सर्वात गलिच्छ आणि किळसवाण्या अन्नासाठी लोक रस्त्यामध्ये एकमेकांवर तुटून पडायचे. . . . न पुरलेल्या मृत शरीरांमुळे दमट उष्ण हवा विषारी झाली, आणि लोक आजारपण, दुष्काळ आणि तलवार यांना बळी पडले.”