तळटीप
c बवाजानं रूथला “सहा मापे” धान्य दिलं, असं अहवालात म्हटलं आहे. ती किती वजनाची मापे होती हे मात्र सांगितलेलं नाही. त्यानं सहा मापे धान्य दिलं यावरून कदाचित असं सूचित होत असावं, की ज्या प्रकारे सहा दिवस काम केल्यानंतर शब्बाथाचा म्हणजेच विश्रांतीचा दिवस यायचा; त्याच प्रकारे, रूथनं विधवेचं जीवन जगताना केलेलं कष्ट आता संपणार होतं. आणि आता तिला लग्नानंतर आपल्या हक्काच्या घरात “विश्रांती” मिळणार होती. किंवा कदाचित, ती फक्त तेवढंच वजन उचलू शकत असल्यामुळं बवाजानं तिला फक्त सहा मापे धान्य, फावड्यानं मापून दिलं असावं.