नीतिवचनं
२ देशातल्या अपराधांमुळे* त्याचे अधिकारी बदलत राहतील,+
पण समंजस आणि ज्ञानी माणसाच्या मार्गदर्शनामुळे, अधिकारी* बराच काळ टिकून राहील.+
३ दीनदुबळ्यांना लुबाडणारा गरीब माणूस,+
सगळं पीक वाहून नेणाऱ्या पावसासारखा असतो.
६ वाईट मार्गांनी चालणाऱ्या श्रीमंत माणसापेक्षा
खरेपणाने चालणारा गरीब माणूस बरा!+
१० जो सरळ मनाच्या माणसाला बहकवून वाईट मार्गाला लावतो, तो आपणच खोदलेल्या खड्ड्यात पडतो;+
पण निर्दोष माणसाला चांगल्या गोष्टींचा वारसा मिळेल.+
१२ नीतिमानांचा विजय होतो, तेव्हा लोक जल्लोष करतात,
पण दुष्टांच्या हाती सत्ता येते, तेव्हा लोक लपून बसतात.+
१३ जो आपले अपराध लपवून ठेवतो, त्याला यश मिळणार नाही,+
पण जो ते कबूल करून सोडून देतो, त्याला दया दाखवली जाईल.+
१५ असाहाय्य लोकांवर राज्य करणारा दुष्ट शासक,
गरजणाऱ्या सिंहासारखा आणि हल्ला करणाऱ्या अस्वलासारखा असतो.+
१६ समंजसपणा नसलेला नेता आपल्या सत्तेचा गैरवापर करतो,+
पण ज्याला बेइमानीच्या कमाईची घृणा वाटते, त्याला मोठं आयुष्य लाभेल.+
१७ दुसऱ्याचा जीव घेतल्यामुळे रक्तदोषी झालेला, मरेपर्यंत* पळत राहील.+
त्याला कोणीही मदत करू नये.
१९ आपल्या शेतीची मशागत करणाऱ्याला अन्न कमी पडणार नाही,
पण जो निरर्थक कामांच्या मागे लागतो, त्याच्यावर दारिद्र्य येईल.+
२० विश्वासू माणसाला पुष्कळ आशीर्वाद मिळतील,+
पण जो श्रीमंत होण्यासाठी उतावळा असतो, तो निर्दोष राहणार नाही.+
२१ पक्षपात करणं चांगलं नाही;+
पण कधीकधी माणूस भाकरीच्या तुकड्यासाठी चुकीचं काम करतो.
२२ दुसऱ्यांचा हेवा करणारा* माणूस श्रीमंत व्हायला उत्सुक असतो;
पण आपल्याला गरिबी गाठेल हे त्याला माहीत नसतं.
२४ जो आपल्या आईबापाला लुबाडून, “यात काहीच चुकीचं नाही,” असं म्हणतो,+
तो नाश करणाऱ्याचा साथीदार असतो.+
२७ जो गरिबाला मदत करतो त्याला काहीच कमी पडणार नाही,+
पण जो त्यांना पाहून न पाहिल्यासारखं करतो, त्याला बरेच शाप लागतील.
२८ दुष्ट सत्तेवर येतात, तेव्हा लोक लपून बसतात,
पण दुष्टांचा नाश होतो, तेव्हा नीतिमान लोक वाढतात.+